घरमुंबईपतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची स्वत:ला पेटवून आत्महत्या

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची स्वत:ला पेटवून आत्महत्या

Subscribe

पतीचे नातेवाईक या महिलेचा मानसिक छळ करुन मारहाण करत असल्याचे समोर आले.

पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने स्वत: पेटवून आत्महत्या केली. ही घटना कशेळी तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी पतिसह त्याच्या परिवारावर गुन्हा नोंदवला आहे. पतीचे नातेवाईक या महिलेचा मानसिक छळ करुन मारहाण करत असल्याचे समोर आले.

अंजूर उमेश विश्वकर्मा (२७) असे या मृत महिलेचे नाव आहे. अंजूर तिच्या पतीसह त्याच्या परिवारासोबत कशेळी येथील शिल्पवास्तू इमारतीत राहत होती. अंजुर ही पती उमेश रामजी विश्वकर्मा आणि तिचा दीर मुकेश रामजी विश्वकर्मा यांच्यासोबत राहत होती. अंजूर हीचा उमेश आणि मुकेश नेहमी मानसिक छळ करून मारहाण करीत होते. यांच्या वागणुकीला वैतागून पत्नी अंजूर हिने १५ जून रोजी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटून घेतले. त्यानंतर अंजूरच्या सासरच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी चौकशी केली असता हा अपघात असल्याचे उमेश याने भासवले. परंतु अंजूर हीचा जबाब नोंदविला असता तिने आपल्या आत्महत्येस पती आणि दीर यांनी प्रवृत्तकेल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दिली.

- Advertisement -

दरम्यान, अंजुरचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. सरकारच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक मंगेश बु-हाडे यांनी पती उमेश आणि मुकेश विश्वकर्मा या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६,४९८[अ ],३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -