घरमुंबईदहावी, बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून

दहावी, बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून

Subscribe

दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंबाने होत असलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळातर्फे दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेले व एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यार्थी व पालकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी मुंबई विभागातर्फे विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. परीक्षांच्या काळात जे विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांनी नियुक्ती मुंबई विभागीय मंडळातर्फे करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत हा हेल्पलाईन क्रमांक सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सुरू राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -