घरमुंबईमहिनाभराच्या टोलमुक्तीच्या श्रेयासाठी सर्वच पक्ष सरसावले

महिनाभराच्या टोलमुक्तीच्या श्रेयासाठी सर्वच पक्ष सरसावले

Subscribe

वाहतूक कोंडी आणि टोल वसुलीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी एमएसआरडीसीने महीनाभरासाठी टोलमुक्ती जाहीर केली. मात्र या टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधार्‍यांसोबत इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या बॅनरबाजीची ठाण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

वाहतूक कोंडी आणि टोल वसुलीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी एमएसआरडीसीने महीनाभरासाठी टोलमुक्ती जाहीर केली. मात्र या टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधार्‍यांसोबत इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या बॅनरबाजीची ठाण्यात जोरदार चर्चा सुरु आहे. ही टोलमुक्ती अमलात आल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचे काम सुरू झाले आहे. टोलनाका परिसरात ठिकठिकाणी फलक लावून आपल्या पक्षाच्या कामगिरीमुळे टोलमुक्ती झाल्याची बॅनरबाजी करीत आहेत. तर पक्ष कार्यकर्ते आमच्याच पक्षामुळे कशी टोलमुक्ती मिळाली हे ठाणेकरांच्या माथी मारत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांमध्ये टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु झाली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कामामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बायपास दुरुस्तीमुळे अवजड वाहने शहरामधील रस्त्यावरून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे टोलनाक्यावर लागणार्‍या प्रचंड रांगा, त्याचो छोट्या वाहनधारकांना होणारा प्रचंड त्रास ठाणेकरांची डोकेदुखी झाली होती. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी वाहनांना ऐरोली किंवा मुलुंडपैकी एकच टोल भरण्याचा दिलासा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, टोल कंपन्यांनी त्याला केराची टोपली दाखवली.
वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पालकमंत्र्यांनी पिवळ्या पट्ट्याचा नियम करून पाहिला. मात्र सद्यस्थितीत तो पिवळा पट्टाही नामशेष झाला. अखेर यावर तोडगा म्हणून लहान वाहनांना ऐरोली आणि मुलुंड पूर्व आणि पश्चिमचे टोल महिन्याभरासाठी टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील वाहनधारकांना महिन्याभरासाठी का होईना टोलमधून दिलासा मिळाला आहे. मात्र वाहतुक कोंडीपासून अद्यापही सूटका झाली नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

सकाळी आणि सांयकाळच्या रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी पार केल्यावरच नागरिकांना टोल नाका ओलांडता येतो. त्यातच टोलनाक्यासमोरच असलेल्या खड्ड्यातून वाचवत वाहने चालवण्याचे दिव्य वाहनचालकांना करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. तरीही प्रत्येक पक्ष टोलमुक्तीच्या श्रेयासाठी पोस्टरबाजी करत असल्याने वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

भाजपचा प्रचार
गणेशोत्सवापर्यंत मुलुंड आणि ऐरोली या टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी टोल स्वातंत्र्य द्यावे अशी कळकळीची विनंती ठाण्याचे राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली होती.त्यावरून सर्व हलक्या वाहनास टोल माफी जाहीर केली आहे. असा भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

- Advertisement -

सेनेलाही हव आहे श्रेय
हलक्या वाहनांच्या टोल वसुलीला एक महिना स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी शिंदेंनी पुढाकार घेतला असे सांगत शिवसैनिक श्रेय घेत आहेत.

राष्ट्रवादीही मागे नाही
मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. या आंदोलनाचा धसका घेतलेल्या एमएसआरडीसीने तत्काळ पावले उचलली. ऐरोली किंवा मुलुंड या पैकी एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची सूट वाहनचालकांना दिला आहे. असा जोरदार प्रचार राष्ट्रवादी कडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -