घरताज्या घडामोडी'हे वागणं सेक्युलर नव्हे', राऊतांचे काँग्रेसला खडे बोल

‘हे वागणं सेक्युलर नव्हे’, राऊतांचे काँग्रेसला खडे बोल

Subscribe

काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून औरंगाबादला सेक्युलर म्हणण्यात आले होते. याच विषयाला धरून संजय राऊत यांनी औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे' असे म्हणतं राऊतांनी काँग्रेसवर टिकास्र सोडले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेला आला आहे. ओरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावा घेऊन सत्तेत असलेली शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. त्यांच्यात नेहमीच या विषयावरून खडाजंगी पहायला मिळत असते. शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सेक्युलरवादाच्या मुद्द्यावरून टिकास्र सोडले आहे. सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निषाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून औरंगाबादला सेक्युलर म्हणण्यात आले होते. याच विषयाला धरून संजय राऊत यांनी औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे’ असे म्हणतं राऊतांनी काँग्रेसवर टिकास्र सोडले आहे.

औरंगाबादमध्ये सध्या महापालिका निवडणूकांची जोरदार तयारी सरू आहे. राऊतांनी त्यांच्या सदरात असे लिहिले आहे की, हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणूनच बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी यासारख्या लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा होता. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन करायच्या? औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्राहून सुटका ही वीरगाथा त्यानंतर घडली, महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढ्याचे नेतृत्त्व आधी छत्रपती शिवाजीमहाराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्चा मऱ्हाडी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री औरंगाबाद नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे सेक्युलर पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजेच स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय ? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरू औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच’, असे राऊत यांनी लिहिले आहे

- Advertisement -

औरंगजेब हा सेक्युलर वगैरे अजिबात नव्हता. महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमित पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवी. औरंगजेब मोगल शासक आणि आक्रमक होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला.अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.


हेही वाचा – शरद पवार दुट्टपी, महाराष्ट्रातील जनता बघतेय- अतुल भातखळकर

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -