घरमनोरंजन'ठाकरे'नंतर संजय राऊत करणार आणखी तीन चित्रपटांची निर्मिती

‘ठाकरे’नंतर संजय राऊत करणार आणखी तीन चित्रपटांची निर्मिती

Subscribe

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटाच्या यशानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणखी तीन नव्या चित्रपटांची निर्मिती करणार आहेत.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाच्या यशानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणखी तीन नव्या चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे राजकारणात वेगळी छाप निर्माण केलेले संजय राऊत आता लवकरच आपल्या तीन चित्रपटांची घोषणा करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी त्यांचे बाळकडू आणि ठाकरे हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

ठाकरे सिनेमाचा सिक्वेल 

दरम्यान, या तीन नव्या चित्रपटांमध्ये ठाकरे सिनेमाच्या सिक्वेलचा समावेश असून यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या ठाकरे सिनेमाच्या सिक्वेलसाठी संजय राऊत संपूर्ण नवीन टीम घेणार असून, ‘ठाकरे’ चित्रपटात आपल्या अभिनयातून बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात नसेल, अशी देखील माहिती मिळत आहे. तसेच ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा देखील नवीन प्रकल्पांत समावेश नसणार आहे. ठाकरे सिनेमाच्या सिक्वेलची तयारी संजय राऊत यांनी सुरू केली असून, या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी कुणाला घ्यायचे यासाठी शोध मोहीम सुरू आहे. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या जागी कुणाला घ्यायचे याचा विचार सध्या सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी सरकारमुळेच देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंह यांची टीका


सिक्वेलनंतर हे दोन सिनेमे 

सध्या जरी संजय राऊत हे ठाकरे सिनेमाच्या सिक्वेलवर विचार करत असले तरी यानंतर माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित देखील चित्रपटाची निर्मिती संजय राऊत करणार आहेत. या सिनेमामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचे कार्य, त्यांचा लढा, त्यांचे आयुष्य याचबरोबर त्यांचे बाळासाहेबांसोबत असणारे मैत्रीचे संबंध यावर देखील प्रकाश टाकला जाणार आहे. तर संजय राऊत यांचा तिसरा सिनेमा हा २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यावर असणार आहे. या सिनेमामध्ये लोकांना माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे. २६/११ च्या हल्ल्यात काही गोष्टी अशा घडल्या ज्या अजूनही सामान्य जनतेपर्यंत पोचलेल्या नाहीत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे या गोष्टी संजय राऊत यांना जगासमोर आणायच्या आहेत. संजय राऊत यांचे हे तिनही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस कधी घेऊन येणार हे पाहणं तितकेचं महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -