घरमुंबईरक्तचंदन चोरी प्रकरणातील आणखी दोघा आरोपींना अटक

रक्तचंदन चोरी प्रकरणातील आणखी दोघा आरोपींना अटक

Subscribe

दुबईला तस्करीच्या तयारीत

बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्तचंदनाची दुबईला तस्करी करण्याच्या तयारीत असणार्‍या आणखी दोघा आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. भारत नारायण पाटील (बोकडवीरा) आणि राजेश वसंत जगताप (उरण) अशी या आरोपींची नावे असून न्यायालयाने दोन्ही आरोपींची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे. यापूर्वी तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील १२ आरोपींना अटक केली होती.फेब्रुवारी २०१५ मध्ये तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्गावरील कल्हे येथील सिद्धांत हॉटेलसमोर तालुका पोलिसांना बेवारस स्थितीत ट्रेलरसह सील नसलेला कंटेनर आढळला होता. पोलिसांनी या बेवारस कंटेनरची तपासणी केली असता त्यात रक्तचंदनाचे ८ ओंडके सापडले. पोलिसांनी ट्रेलरसह कंटेनर व रक्तचंदन जप्त करून गुन्हा दाखल केला व तपासाला सुरुवात केली.

ट्रेलर चालकाचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. त्यानंतर गाडी विकत घेणारा प्रशांत भिलारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने इतर आरोपींच्या मदतीने रक्तचंदनाचे ओंडके बनावट कागदपत्रे बनवून दुबई येथे पाठविणार होते, असे पोलिसांना सांगितले. रहेमान भाई याने पुणे सातारा रस्त्यावरील वेळे फाटा येथून हे रक्तचंदन आणले असल्याचे भिलारे याने सांगितले. कंटेनर क्र. एमएच ०४ बीयू ६६४९ मधील रक्तचंदन चालक रामजन कौल या चालकाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर चालकाला आरोपींनी त्यांच्या चार चाकी गाडीत बसवून खांदा कॉलनीत आणून सोडून दिले व कंटेनर पळवून नेला.

- Advertisement -

२१६ किलोचे २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या वजनाची व लांबीची एकूण ८ रक्तचंदनाच्या ओंडक्याने भरलेला ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचा रक्तचंदन व ट्रेलर कंटेनर चोरट्यांनी चोरून नेला होता. त्यानंतर आरोपींनी दोन कंटेनरचे बॉक्स तयार केले. त्यातील एका बॉक्समध्ये ओरीजनल मेझ स्टार्च पावडर असलेला माल त्यांनी भरला. तो माल कस्टम क्लियरंस झाल्यांनतर त्याच क्रमांकाच्या बनावट कंटेनरमध्ये रक्तचंदनाचा कंटेनर भरून जेएनपिटी बंदरातून दुबई येथे पाठविण्याची तयारी केली होती. हा माल दुबई येथे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपी प्रशांत बबन भिलारे (खारघर), किशोर जगन्नाथ यादव (सातारा), अशोक बाबुराव शेरेकर (सातारा), किशोर गणपत बिरामणे (सातारा), उमेश अशोक सिंग (कलिना), सुमित शिवकुमार वाणी (उरण), संतोष राम पाटील (चिर्ले), दीपक नामदेव पाटील (चिर्ले), बाळा बाबुराव जाधव (खांदा कॉलनी), पांडुरंग तुकाराम बाबरे (खांदा कॉलनी), मिथुन उर्फ बंटी रघुनाथ पाटील (चिरनेर), नितेश सदाशिव पाटील (धुतूम) याना २०१५-१६ मध्ये अटक केली होती. यातील दोन आरोपी फरार होते. त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस हवालदार विष्णू डुबल, पोलीस नाईक गोरख सरोदे, पोलीस नाईक राकेश मोकल, पोलीस नाईक अमोल कांबळे, पोलीस शिपाई संतोष पाटील, पोलीस शिपाई जगदीश भाट यांच्या पथकाने फरार असलेल्या भारत नारायण पाटील (बोकडवीरा) आणि राजेश वसंत जगताप (उरण) दोन्ही आरोपीना शिताफीने अटक केली. आरोपींवर फसवणूक, बनावट कागदपत्रे, भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ व मुंबई अंतर्गत वन अधिनियम १९४२ चे कलम ६६, ८२, १२९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -