घरमुंबईवाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ आक्रमण करणारचं!

वाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ आक्रमण करणारचं!

Subscribe

सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे? वन्य प्राण्यांचेही तेच आहे. माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. त्यामुळे ते आक्रमण करणारचं.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि १३ जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला गोळ्या झाडून ठार करण्यात आले. या घटनेनंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहे. याविरोधात प्राणीमित्रांसह सर्व जण वेगवेगळ्या माध्यमातून निषेध नोंदवत आहेत. सोशल मीडियावर तर अवनीला ठार केल्याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील याविरोधात तीव्र संताप व्यक्त केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनवीला ठार केल्याप्रकरणी सामनाच्या संपादकीयामधून निशाणा साधला आहे. राज्यामध्ये दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत. स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

सामना अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे –

– अवनी वाघीण नरभक्षक झाली. पण वाघ, सिंह हे नरभक्षक झाले व त्यांनी मनुष्यप्राण्यांवर झडप घातली यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? सापाच्या बिळात हात घातल्यावर तो डंख मारणारच. सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे? वन्य प्राण्यांचेही तेच आहे. माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. जंगले तोडली, जाळली. डोंगर फोडले. त्यामुळे वाघांचे जगणे हराम झाले. एवढे सगळे झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या माणुसकीची अपेक्षा करता?

- Advertisement -

– बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात व आसपास बिबटे मनुष्यवस्तीत शिरतात व अनेकदा बळी घेतात. कारण राष्ट्रीय उद्यानात मनुष्यवस्ती वाढली. तुम्ही वाघांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर वाघ तुमच्यावर आक्रमण करणारच. त्यामुळे वाघांना ‘नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालण्यापेक्षा मनुष्याने स्वतःस शिस्त लावणे गरजेचे आहे.

– खुद्द केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीच ‘अवनी’ची निर्घृण हत्या झाल्याचे आणि हा एक मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या शूटरने अवनीला गोळ्या घातल्या त्याचे वडील शाफत अली खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे आणि काही हत्ती मारले आहेत. तरीही महाराष्ट्र सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी अशा माणसाला का दिली असा सवाल करत मनेका यांनी शाफत हे अवैध शस्त्रे पुरविणारे राष्ट्रविरोधी आहेत असाही गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

– आरोप करणारे आणि ‘आरोपी’ एकाच पक्षाचे आहेत. एका बाजूला वाघाचे काळीज असलेले मनुष्यप्राणी महाराष्ट्रातून अस्तंगत होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वाघांनाही खतम केले जात आहे. हिंदुस्थानच्या जंगलातून वाघ कमी होत आहेत व ‘वाघ बचाव’ आंदोलन सर्वच पातळय़ांवर सुरू असताना अवनीस ठार केले गेले.

– कश्मीरात पाक घुसखोरांना मोकाट सोडणाऱ्यांनी काळोखात दबा धरून अवनीस गोळ्या घातल्या. म्हणजे खरे वाघ मारायचे आणि नंतर खोटे वाघ घेऊन फिरायचे. अवनीने म्हणे १३ माणसे खाल्ली म्हणून तिला जिवंतपणी गोळ्या घातल्या, पण महाराष्ट्रात विविध स्तरांवर नरभक्षण सुरूच आहे. ज्या पांढरकवड्यात अवनीस मारले, म्हणजे १३ जणांच्या मृत्यूचा ठपका ठेवून मृत्युदंड दिला.

– यवतमाळ-पांढरकवडा परिसरात सरकारी नादानीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या. कीटकनाशकांमुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे बळी यवतमाळमध्ये गेले. त्यातील गुन्हेगारांना कोणी अवनीप्रमाणे कठोर शिक्षा दिल्याचे दिसले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -