‘पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणी सह अर्थसंकल्पातील गाजर नको, धनगर समाजाच्या हक्काच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा‘,या मागणीला घेऊन महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांचे विधानभवन येथे तीव्र आंदोलन केले आहे. दरम्यान, आश्वासन देणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र यशवंत सेनेने यावेळी निषेध केला आहे. पुरंदर घटनेतील आरोपीकडे प्रशासन आणि राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्या विरोधात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या सैनिकांनी विधान भवन परिसरात समाजावरील अन्यायाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. याप्रकरणी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
या आंदोलनाच्या माध्यमातून विधानभवनात घुसणाऱ्या मुंबई प्रमुख धनाजी धायगुडे, आदिनाथ पाटील, बाळासाहेब खांडेकर, राजेश कोळेकर, अमर इंगळे, मोहन महारनुर, दिनेश सोलनकर,आकाश गुरचळ, प्रकाश गुरचळ, दीपक नरुटे, समाधान इरकर, कृष्णा गडदे, शिवाजी ठोंबरे, आकाश खोत या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा – धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज सह्याद्रीवर मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक
हेही वाचा – धनगर समाजाचा मोर्चा सानपाड्याजवळ रोखला