उपवास असला की सतत तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक वेगळा पदार्थ खास उपवासाठी सांगणार आहोत. त्या पदार्थाचं नाव राजगिऱ्याचे थालीपीठ असं आहे. तुमचा जर नवरात्रीमध्ये उपवास असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा.
साहित्य :
- 2 वाटी राजगिऱ्याचं पीठ
- 2 बटाटे
- पाव वाटी कोथिंबीर
- 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट
- 5 हिरव्या मिरच्या
- साखर
- मीठ
कृती :
- सर्प्रवथम एका ताटात 2 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेऊन त्यामध्ये 2 बटाटे सोलून जाड किसून घाला.
- मग त्यामध्ये पाव वाटी कोंथिबीर, अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट, 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 5-6 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ असे सर्व राजगिऱ्याच्या पिठात घाला.
- मग हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर थोडंस पाणी घालून हे सर्व मिश्रण थोडं घट्ट मळून घ्या.
- मग तुम्ही थालीपीठ तव्यावर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवी थापून घ्या.
- तुम्हाला ज्या पद्धतीने थापता येईल त्या पद्धतीने थालीपीठ थापा.मग थालीपीठ तव्यावर गरम तेलात मस्त भाजून घ्या.
- अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून थालीपीठ छान भाजून घ्या आणि सर्व्ह करा.