सोलापूर-दौंड-मनमाड मध्य रेल्वेच्या मार्गावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा स्टेशनपासून तीन किलोमीटरवर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे घसरले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. या अपघातामुळे सोलापूर-दौंड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे मार्गावरील डबे रुळावर आणण्यासाठी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत हा मार्ग रेल्वे गाड्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -
वळवण्यात आलेल्या प्रमुख रेल्वे अशा
निझामऊद्दी-गोवा
अहमदाबाद-यशवंतपुरम
जम्मुतावी-पुणे
निझामऊदीन-वास्को
अजनी(नागपूर)-पुणे