सतत पडणाऱ्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मुक्या जीवांनाही फटका बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आपल्या घरट्यात राहणारे प्राणी पक्षी घरटं सोडून आडोशाच्या शोधात निघतात. पण, अनेकदा वादळी वारा, प्रचंड पाऊस पडला की पक्षांना हकनाक जीव गमवावा लागतो. अशाच प्रकारच्या घटनेमुळे शहरातील एकूण १७ पक्षांवर वेगवेगळ्या कारणांमुळे उपचार करण्यात आले आहेत.