महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाने आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा आज समारोप झाला. पर्यावरण रक्षणाचा मोठा उद्देश आणि संदेश या माध्यमातून समाजापुढे ठेवला जातो! या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आहेत.