जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील शाळा, महाविद्यालय, मॉल्स, हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुंबईसह अनेक राज्यात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे आज मुंबई शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.
हेही वाचा – करोनामुळे ठाण्यात शुकशुकाट
- Advertisement -