पश्चिम किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर मुंबईसह इतर जिल्ह्यात देखील याचा मोठा फटका बसला आहे. तर या चक्रीवादळाने ठिकठिकाणी लोकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. तर काही ठिकाणी झाडं गाड्यांवर पडून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मौजे सोनावळे तालुक्यातील मुरबाड येथील भेरेवाडी या आदिवासी वस्तीला निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.