दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण असतो. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होऊन नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण एकामागे एक येतात. त्यामध्ये लक्ष्मीपूजनला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच या दिवशी व्यापारी, सराफ आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या सणाला महत्त्व देत चोपडीचे पूजन करतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केट येथे चोपडी पूजन करण्यात आले आहे.