राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या दरम्यान, अनेकांना भरमसाठ वीज बिले आलीत. राज्य सरकारकडून बिलाबाबत सूट मिळेल, असे आधी जाहीर केले होते. मात्र, अनलॉक सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने हात वर केलेत. तुम्हाला आलेली वीज बिले भरावी लागतील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सामान्य वीज ग्राहक हवालदिल झाला आहे. या वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वीज बिलात सूट देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी आज मनसेने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.