ऑस्ट्रेलिया विरुध्द भारताच्या ट्वेंटी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आज बीसीसीआयने १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये तीन फास्ट बॉलरसह हा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. येत्या बुधवारी गॅबा येथे हा सामना होणार आहे.
We've announced our 12 for the 1st T20I against Australia at The Gabba #TeamIndia pic.twitter.com/c6boLtieGf
— BCCI (@BCCI) November 20, 2018
रिषभ पंतला संधी
बीसीसीआयने बुधवारी होणाऱ्या या सामन्यासाठी १२ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात विकेटकिपर म्हणून रिषभ पंत याला संधी मिळाली आहे. तसंच दिनेश कार्तिकलाही संघात संधी मिळाली आहे. कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या स्पिनरना संधी मिळाली आहे. २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता.
Hammer and tongs: @RishabPant777 gets his weapon battle ready
For a batsman, the bat is his main tool. The big-hitting youngster explains what needs to be done before a fresh willow is used in a match – by @28anand
??https://t.co/yQuUpgu18P #INDvAUS pic.twitter.com/pVwE6sf9HS
— BCCI (@BCCI) November 20, 2018
असा आहे भारतीय संघ
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल राहुल, पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि चहल