घरक्रीडाएकदिवसीय मालिकेत भारताची सरशी; ३-१ ने विंडीजवर मात

एकदिवसीय मालिकेत भारताची सरशी; ३-१ ने विंडीजवर मात

Subscribe

तिरुवनंतपुरम येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताने उकृष्ठ कामगिरी केली आहे. भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली आहे. भारताचा हा वेस्ट इंडिजविरुद्धचा आठवा मालिका विजय ठरला आह. यापूर्वी भारताने २००६ साली वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवला होता.


भारताने तुफान गोलंदाजी करत १०४ धावांत खुर्दा उडवला. रविंद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक चार बळी मिळवले. वेस्ट इंडिजच्या १०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी नाबाद ६३ धावांची दमदार खेळी साकारली. कोहलीने यावेळी नाबाद ३३ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -