घरक्रीडाप्रसारण कंपनीच्या पैशांवर पाणी

प्रसारण कंपनीच्या पैशांवर पाणी

Subscribe

या वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यातील ३ सामन्यांमध्ये पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही, तर एक सामना रद्द करण्यात आला. मात्र या पावसाचा फटका, विश्वचषक सामन्यांचे भारतात थेट प्रसारण करणार्‍या स्टार इंडिया कंपनीलाही बसला आहे. ४ सामने रद्द झाल्यामुळे स्टार इंडिया कंपनीला किमान १०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

रविवारी मँचेस्टरच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. स्थानिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी मँचेस्टरमध्ये ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील परिस्थिती आता फारशी चांगली नाही आणि रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहिरातदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

- Advertisement -

जाहिरात करणार्‍या कंपनीसाठी ही परिस्थिती मोठी पेचाची आहे. प्रसारणाचे हक्क घेतल्यामुळे त्यांना आयसीसीला पैसे देणे भाग आहे, मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहिरातदार कंपनीला पैसे देणार नाहीत. त्यामुळे यामधून होणारा तोटा भरुन काढण्यासाठी विमा हा एक पर्याय उरतो. मात्र विमा कंपनी, सर्व प्रक्रीया केल्याशिवाय पैसे देणार नाही. यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणे देवून विमा कंपन्या किमान ८ ते १० टक्के रक्कम कापूनही देतात, असे नियो स्पोर्ट वाहिनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश थवानी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -