इंग्लंड येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रात्री रवाना होणार आहे. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कप्तान विराट कोहली यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ सज्ज असून आम्ही पूर्ण क्षमतेने खेळणार असल्याचे विराट कोहली याने यावेळी सांगितले.
WATCH: Virat Kohli and Ravi Shastri address the media before leaving for England #WorldCup https://t.co/KRfX78P6l1
— ANI (@ANI) May 21, 2019
टीम इंडियामध्ये जिंकण्याची क्षमता असून, सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या मॅचपासूनच दमदार कामगिरी करावी लागणार असून गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही कोहलीने सांगितले. तर गोलंदाज आणि फलंदाजांची संतुलित टीम असल्याचे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.
#TeamIndia for @ICC #CWC19 ??#MenInBlue ? pic.twitter.com/rsz44vHpge
— BCCI (@BCCI) April 15, 2019
बीसीसीआयची निवडणूक २२ ऑक्टोबरला
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक येत्या २२ ऑक्टोबरला होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत त्रिसदस्यीय समितीनं हा निर्णय जाहीर केला. ३० जूनपासून बीसीसीआयची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. याच दिवशी बीसीसीआयकडून निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक होईल आणि त्यांच्याकडून निवडणूक आचारसंहिता तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रशासकीय समितीशी त्याबाबत सल्लामसलत करून सर्व राज्यांच्या संघटनांना कळवण्यात येईल.
Committee of Administrators (CoA): Board of Control for Cricket in India (BCCI) elections to be held on 22nd October 2019. pic.twitter.com/TVoBph4Pqd
— ANI (@ANI) May 21, 2019