महाराष्ट्राचे राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट आणि सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्यानंतर कधी नव्हे ते राज्यपालांवर देखील सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत. राज्यपाल पद हे घटनात्मक पद असून त्याची एक प्रतिष्ठा आहे. मात्र नेटीझन्सवरील तरुण आपली रोखठोक मते न घाबरता व्यक्त करतात. सध्या असेच एक मत एका नेटीझन्सने व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अनेक पक्षांचे लोक राज्यपालांची भेट घेत आहेत. या बैठकांचे लाईव्ह टेलिकास्ट राज्यपालांनी करावे, म्हणजे जनतेला हे पक्ष कशाप्रकारे चर्चा करतात हे कळू शकेल, असे ट्विट एका तरुणाने केले आहे.
Governor should live video telecast the discussions. Let the people see how well these parties are discussing “farmer issues”!
ashwath (@ash7k) October 6, 2019
९ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपल्यापासून अनेक पक्षांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र एकाही बैठकीत सत्ता स्थापनेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यावर काही मिम्स आले आहेत. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी, यासाठी अनेकजण राज्यपालांना जाऊन भेटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली. तर उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटायला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
NCP leader Nawab Malik: Maharashtra Governor has given Shiv Sena, NCP and Congress leaders time for a meeting tomorrow at 3 pm, to discuss farmers issue. (File pic) https://t.co/ZOyvaJN3Ry pic.twitter.com/xvcBnJ9Nk4
— ANI (@ANI) November 15, 2019
राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडलेला असताना राज्यात मात्र सरकारच अस्तित्वात नाही. सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राजकीय पक्षांच्या राजभवनात फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र या फेऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची झालर लावली जात आहे की खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होते? असा प्रश्न काहींना पडला आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेक तरुण आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत.
मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. pic.twitter.com/lM8TVFHSmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019