- Advertisement -
भाजप नेते नारायण राणेंनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने राज्य सरकारवर केलेल्या टीकेला परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आमच्या कामाला नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, त्यांच्या सर्टिफिकेटला काडीचीही किंमत नाही’, अशा शब्दांत अनिल परब यांनी टीका केली आहे. विरोधत वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना अशाच पद्धतीने ५ वर्ष टीका करत राहावी लागणार आहे, असं देखील अनिल परब यावेळी म्हणाले.
- Advertisement -