- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर लाईव्ह येत राज्यातील जनतेला संबोधित केले. मुंबई MMRDA क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळून सर्व काही बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवरुन २५ टक्क्यावर आणणार असल्याचेही ते म्हणाले.
- Advertisement -