- Advertisement -
एल्फिन्स्टन दुर्घटनेमध्ये मुंबईकरांना जिवानिशी जावं लागल्यानंतर देखील प्रशासनाने त्यातून काहीच धडा घेतलेला नसल्याचं सांताक्रूझ स्टेशन पाहिल्यानंतर सहज दिसून येईल. सकाळी आणि संध्याकाळी सांताक्रूझच्या मधल्या ब्रिजवर होणारी गर्दी कधीही भीषण दुर्घटनेमध्ये परावर्तित होऊ शकते. कदाचित त्यानंतरच प्रशासनाचं सांताक्रूझ स्टेशनकडे लक्ष जाईल.
- Advertisement -