- Advertisement -
आरेमधील वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा विरोध पाहून सुप्रीम कोर्टाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने ज्या निर्दयीपणे वृक्षांची हिंसा केली, त्याचा हिशेब त्यांना द्यावे लागेल. तोडलेले प्रत्येक झाड, त्यावरील बेघर झालेला पक्षी या सरकारला शाप देणार. मतदानापर्यंत आरेचा विरोध शांत व्हावा, यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेचा विरोध २१ नंतरही कायम राहिला पाहीजे, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -