- Advertisement -
नाशिक येथील गंजमाळ परिसरातील भिमवाडी झोपडपट्टीला आग लागून ११६ परिवाराचे नुकसान झालेले होते. या ११६ परिवारातील सहाशे नागरिकांचं घर असणाऱ्या झोपड्या पूर्ण जळाल्यामुळे त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निर्वासितांचे जीवन जगावे लागत आहे. या ११६ परिवारांना एक लाख रुपये प्रती परिवार मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. आतापर्यंत भीम वाडी येथील कै. कलाबाई दगडू साळवे, कै. सरुबाई शशिराव मुंडे आणि कै. ज्ञानाबाई कढळू हिरोडे या तीन महिलांचा धक्का बसून दुर्दैव मृत्यू झालेला आहे.
- Advertisement -