- Advertisement -
ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही गोळी वर्मी लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, जमील शेख यांच्या हत्येनंतर आपले संरक्षण काढून घ्यावे अश्या आशयाचे एक पत्र मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच यापुढील टार्गेट आपणच असणार, असे वक्तव्य अविनाश जाधव यांनी केले आहे. त्याचुप्रमाणे या अशा घटनांमुळे मनसेचे पदाधिकारी ठाणे शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
- Advertisement -