- Advertisement -
मनसेकडून एचएच ०४ या क्रमांकाच्या वाहनांकडून टोल आकारणी करू नये या मागणीसाठी मंगळवारी आनंदनगर टोलनाक्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. ठाणेकरांची टोल मुक्तीतून लवकरात लवकर सुटका करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ठाण्यातून मुलूंडच्या हद्दीत जाण्यासाठी ठाणेकरांना टोल भरावा लागत असल्याने हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी टोल मुक्ती व्हावी, अशी मनसेची मागणी आहे.
- Advertisement -