- Advertisement -
लॉकडाऊन उठवल्यानंतर नवी मुंबईत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मात्र, हाऊस टू हाऊस सर्वेक्षण आणि मास स्क्रिनिंग करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. सध्या नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ ते ६० टक्के आहे तर मृत्युदर ३.३ टक्के आहे. रिकव्हरी रेट वाढवून मृत्युदर कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे, कोरोनाला हरविण्यासाठी आम्ही लढत आहोत, अशी भावना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.
- Advertisement -