- Advertisement -
मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, म्हणून आघाडी सरकारनेच जागा निश्चित केली होती. त्यानंतर भाजपचे सरकार आले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते जलपूजन केले होते. मात्र आता कॅगने शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले आहे. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच शिवस्मारकाच्या भ्रष्टाचारात आपले हात धुतलेले आहेत. यांचा भ्रष्टाचार आम्ही विधानसभेत उघडा पाडू, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी दिले आहे.
- Advertisement -