- Advertisement -
२०२२ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबतच महाविकासआघाडीतले तिनही पक्ष कामाला लागल्याचं दिसत आहे. मात्र, काँग्रेसने मुंबई पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. जर काँग्रेसनं आघाडीत निवडणुका लढल्या, तर काँग्रेसची वाताहत होणार, असं भाकित मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलं आहे. माय महानगरला दिलेल्या स्पेशल मुलाखतीमध्ये त्यांनी हे भाकित केलं आहे.
- Advertisement -