- Advertisement -
भाजप सध्या सत्तेत नाही. त्यामुळे भाजपमध्ये आलेले नेते त्यांना सोडून जाऊ नयेत, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वायफळ वक्तव्ये करत आहेत, असा आरोप गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नसून लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
- Advertisement -