- Advertisement -
31 मार्चपर्यंत नवी मुंबईतील एपीएमसी सुरु राहणार आहे. मात्र गर्दी टाळण्याठी भाजीपाला किराणा दुकानांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एपीएमसी बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु एपीएमसी समिती, व्यापारी, माथाडी कामगार आणि पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीत एपीएमसी सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. मार्केट सुरू झालं पण मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीचे निर्जतूंकीकरण केलं जात आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सचीही खबरदारी घेतली जात आहे.
- Advertisement -