- Advertisement -
ज्यू धर्मीयांचे मुंबईतले अस्तित्व हे मुंबईच्या मूळ उभारणीपासून आहे. ज्यू धर्मियांचे मराठीसाठीचे योगदान, ज्यू धर्मियांचा मुंबईत वाढलेला व्यापार, मुंबई शहरासाठीचे ज्यू धर्मियांचे योगदान आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकांना नावे अशा अनेक गोष्टींमुळे ज्यू समाजाचे मुंबईतल अस्तित्व इतिहासात डोकावल तर दिसून येत. पण ज्यू समाज मुख्यत्वेकरून मोठ्या चर्चेत आला तो म्हणजे २६/११ च्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर. यामध्ये ज्यू धर्मीयांचे प्रार्थना स्थळ असलेले मुंबईतल्या खाबाड हाऊसवरही हल्ला केला गेला. खाबाड हाऊस का होत नेमक दहशतवाद्यांच्या रडावर हेच कनेक्शन शोधण्याचा हा एक प्रयत्न.
- Advertisement -