Monday, April 15, 2024
घरमानिनीReligiousवृंदावनातील 'ही' तीन रहस्य तुम्हाला ठाऊक आहेत का?

वृंदावनातील ‘ही’ तीन रहस्य तुम्हाला ठाऊक आहेत का?

Subscribe

श्री कृष्णांनी अनेक काळ वास्वव्य केलेल्या वृंदावनाबाबत आजही अनेक रहस्य सांगितली जातात. वृंदावनात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य आजही एक कोडेच आहे. आज आम्ही तुम्हाला या रहस्यांपैकी तीन महत्त्वाचे रहस्य सांगणार आहोत.

वृंदावनातील निधिवन

रहस्यमयी और अलौकिक निधिवन - यहाँ आज भी राधा संग रास रचाते है कृष्ण, जो भी देखता है हो जाता है पागल - Ajab Gajab

- Advertisement -

वृंदावनातील निधीवनाबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. निधिवनमध्ये संध्याकाळनंतर जाणं निषिद्ध मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, निधिवनामध्ये संध्याकाळी श्रीकृष्ण आणि राधा सर्व गोपीकांसोबत रास करायला येतात. त्यामुळे कोणाच्याही जाण्याने त्यांच्या रासलीला अडथळा येऊ नये. म्हणून भक्तांना रात्री येथे येण्यास मनाई आहे.शिवाय निधीवनाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनीही चुकूनही ती जागा पाहू नये म्हणून त्यांच्या घराच्या खिडक्यांना कुलूप लावले आहे.

असे मानले जाते की, आजही श्री कृष्ण निधीवनच्या रंगमहालात विसावतात आणि दुसऱ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडल्याचे याचे पुरावे देखील पाहायला मिळतात.

- Advertisement -

वृंदावनातील झाड

Mystery of Nidhivan Vrindavan, Nidhivan Story in Hindi, Images, Videos, Map | Shri Mathura Ji

असं मानलं जातं की, निधिवनामध्ये सर्व झाडे ही सर्व गोपींची रूपे आहेत, म्हणूनच तेथील झाडे सरळ नसून वेगवेगळ्या मुद्रांमध्ये आहेत. या झाडांची विधिवत पूजा केली जाते. निधिवनच नाही तर वृंदावनातील सर्व झाडे गोपी आणि ऋषींच्या रूपात आहेत, त्यामुळे झाडांची जोडी असो वा एकच झाड, ते सरळ नसून ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाकलेले आहे.

वृंदावनातील या झाडांना पाणी अर्पण करून पूजा केल्यास त्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते आणि ऋषीमुनींचे पूर्ण आशीर्वादही प्राप्त होतात.

वृंदावनातील रंगजी मंदिर

वृन्दावन - विकिपीडियावृंदावन जंगलात रंगजी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरातील स्वयंपाकघरात 400 वर्षांपासून अखंड अग्नी जळत आहे. ही आग आजपर्यंत कोणीही विझवू शकलेले नाही. असं मानलं जातं की, ज्या व्यक्तींनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना दिव्य अनुभव आले ज्यामुळे त्यांनी स्वतःचं मानसिक संतुलन गमावल. मंदिरातील नैवेद्य त्याच आगीत शिजवला जातो. त्या अग्नीत शिजवलेल्या प्रसादाचे सेवन केल्यास रोगमुक्ती होते.

 


हेही वाचा :

प्राचीनकाळातील ‘हे’ दिव्य पुरुष आजही आहेत अस्तित्वात

- Advertisment -

Manini