आपल्या आसपासच्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. तसेच वास्तु शास्त्रानुसार व्यक्तीच्या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्तु शास्त्रानुसार काही गोष्टी आपण दुसऱ्यांकडून मागून वापरल्यास त्याचा वाईट नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं नुकसान देऊ शकतात.
दुसऱ्यांकडे ‘या’ 3 गोष्टी कधीही मागू नये
सुई
वास्तू शास्त्रानुसार, कधीही दुसऱ्यांकडून सुई मागू नये. शेजाऱ्यांकडून किंवा इतर कोणाकडूनही सुई मागून वापरल्यास आयुष्यात नकारात्मकता येते. यामुळे कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होते.
मीठ
वास्तू शास्त्रानुसार, संध्याकाळनंतर कधीही दुसऱ्यांकडून मीठ मागू नये. दुसऱ्यांकडून मीठ आणल्यास घरात सुख-समृद्धी निघून जाते. कर्ज वाढते.
दही
अनेकदा स्त्रिया शेजाऱ्यांकडून दही लावण्यासाठी मागतात, जे चुकीचे आहे. पण कधीही दुसऱ्यांच्या घरातील दही मागून आणू नये. नाहीतर यामुळे घरातील सुख-शांतीचा नास होतो.
हेही वाचा :