Thursday, April 25, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : 'या' 5 चुकांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर नाराज

Vastu Tips : ‘या’ 5 चुकांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर नाराज

Subscribe

आपल्याकडून कधी-कधी नकळत अशा काही चूका होतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रुसू शकते. ज्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन-संपत्तीची अधिष्ठात्री देवी मानलं जातं. आपल्यापैकी अनेक जणांना देवी लक्ष्मी आपल्यावर निरंतर आनंदी असावी असं वाटतं. देवी लक्ष्मी आपल्यावर खूश असेल तर, आपल्याला कधीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. परंतु देवी लक्ष्मी खूप चंचल आहे, त्यामुळे ती अधिक काळ एका ठिकाणी थांबत नाही. शास्त्रामध्ये अश्या काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत. आपल्याकडून कधी-कधी नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रुसू शकते. ज्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

चुकूनही करू नका ‘या’ 5 चुका

  •  सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने


हिंदू वेद, पुराणांमध्ये सकाळी सूर्योदयाआधी उठणं सगळ्यात उत्तम मानलं आहे. परंतु आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मी सदैव नाराज असते. त्याबरोबरच संध्याकाळीसुद्धा झोपल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. कारण शास्त्रात सकाळ आणि संध्याकाळची वेळ पूजा, आराधना करण्याची वेळ मानली जाते, त्यामुळे यावेळी झोपल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.

- Advertisement -
  • रात्रीच्या वेळी नखं कापल्याने


अनेक जण आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणतंही काम कधीही करतात, परंतु या गोष्टींचा वाईट परिणाम त्यांना नकळत भोगावा लागतो. काहीजण रात्रीच्या वेळी नखं कापतात जे शास्त्रात अशुभ मानलं जातं. ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.

  •  जेवता- जेवता उठने


शास्त्रात सांगण्यात आलं आहे की, जेवन जेवताना कधीही उठू नये, असं केल्याने देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. देवी अन्नपूर्णा ही देवी लक्ष्मीचेच एक रूप आहे. त्यामुळे जे लोक जेवताना सारखे उठतात, त्यांच्या घरात कधीच समृद्धी येत नाही. त्यांच्यावर देवी लक्ष्मी सदैव नाराज असते.

- Advertisement -
  • स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवल्याने


रात्री झोपण्यापूर्वी कधीही खरकटी भांडी ठेवू नये, असं केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर नाराज होते.

  • संध्याकाळनंतर कोणालाही मीठ देऊ नका


तुमचा कितीही चांगला मित्र असला तरी, त्याला कधीही संध्याकाळनंतर मीठ देऊ नका, कारण मीठ दिल्याने आपल्या घरातील सुख-समृद्धीचा नाश होतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकट भोगावे लागू शकते. शिवाय संध्याकाळनंतर बाहेरील व्यक्तीला मीठ दिल्याने देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर नाराज होईल.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini