घरताज्या घडामोडीAlibaug : निटकोचे कामगार रस्त्यावर उतरणार

Alibaug : निटकोचे कामगार रस्त्यावर उतरणार

Subscribe

तीन वर्षांपूर्वी बंद पडलेल्या तालुक्यातील श्रीगाव येथील निटको कंपनीच्या कामगारांना अद्यापही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसून, औद्योगिक न्यायालयात कामगारांच्या बाजूने निर्णय लागूनही केवळ कामगार संघटनेतील वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे देण्यास दिरंगाई केली जात आहे. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी दिला आहे.कंपनी व्यवस्थापन कामगारांचे पैसे देण्यास तयार असताना संघटनेचे पदाधिकारी कोणत्या कारणासाठी खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवाल केणी यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत कष्टाचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत केणी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक कामगारांच्या साधारण बाराशे कुटुंबियांनी रस्त्यावर उतरून लढा देण्याचाही निर्धार केला आहे. निटको कंपनीत साधारण ३५० कामगार काम करीत होते. या सर्व कामगारांचे पैसे कंपनीने न दिल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रॅज्युएटीचे पैसे मिळावे यासाठी या कामगारांनी एक वर्षभर आंदोलन केले होते. त्यानंतर औद्योगिक न्यायालयात चाललेल्या दाव्यात कामगारांच्या बाजूने निकाल लागला.

परंतु केवळ पदाधिकार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. कंपनी व्यवस्थापन पैसे देण्यास तयार आहे; परंतु कामगार संघटनेचे पदाधिकारी व्यवस्थापनाशी वाद घालत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. अखेर हा वाद केणी यांच्यापर्यंत आला आहे. त्यांनी या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना केणी यांनी सांगितले की, पदाधिकार्‍यांमुळे कामगारांवर अन्याय होत आहे. वर्षानुवर्षे काम केल्यानंतर हक्काचे पैसे देण्यास संघटना असमर्थ ठरत असेल, तर ते फार चुकीचे आहे. यात अनेक स्थानिक कामगार आहेत. या साडेतीनशे कामगारांवर अवलंबून असणार्‍या त्यांच्या कुटुंबातील साधारण बाराशेजणांचे जगणेही कठीण झाले आहे.

- Advertisement -

कंपनी बंद झाल्यानंतर या कामगारांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ग्रॅच्युईटीच्या पैशांसह इतर हिशोबही देण्यात आलेला नाही. ही अन्याय करणारी बाब असून, यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल, असाही इशारा केणी यांनी दिला आहे.


हे ही वाचा – राजकारण्यांनी तारतम्य सांभाळून बोलले पाहिजे, जयंत पाटलांचा सल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -