46 more #COVID19 cases & 1 death reported today in Dharavi area of Mumbai. Total number of cases in the area now at 962, including 31 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/7nR8qmgxq5
— ANI (@ANI) May 12, 2020
राज्यभरातल्या मद्यप्रेमींसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कंटेन्मेंट झोन सोडून १४ तारखेपासून घरपोच दारू मिळणार आहे, असा निर्णय राज्य उत्पादन विभागाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे शॉप सुरू करता येणार नाही. रेड झोनमध्ये फक्त कंटेन्मेंट झोन सोडून सेवा देण्यात येणार आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सकाळी ९ नंतरपासून पुण्यात ९७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार १०५ रुग्ण झाली आहे.
परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मिशन पहिला टप्पा ७ मे ते १३ मे पर्यंत होता. आता या मिशन दुसरा टप्पा १६ मे ते २२ मेपर्यंत असणार आहे. यादरम्यान ३१ देशांमधील भारतीयांना परत आणले जाणार आहे. फीडर फ्लाइट्ससह १४९ उड्डाणे तैनात करण्यात येणार आहेत.
The second phase of #VandeBharatMission will be launched from 16-22 May. It will bring back Indians from 31 countries. 149 flights including feeder flights will be deployed: Sources pic.twitter.com/SJYwCCpcBI
— ANI (@ANI) May 12, 2020
महाराष्ट्रातील संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, असे असताना देखील अनेक जण संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)
As many as 1,04,449 offences regd. u/s 188 of IPC since the lockdown leading to 19,838 arrests & seizure of 56,473 vehicles.
₹3,97,87,644 have been collected in fines from offenders.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 12, 2020
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आता हा आकडा २३ हजार ४०१ जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, या कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तर या सर्वांना ने – आण करण्यासाठी बेस्ट कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने वेढले आहे. मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टमधील ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपतो आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर मोदी आज बोलणार आहेत. त्यामुळे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग सुरू होताच पहिल्या ३ तासांत ३० हजार तिकिटं बुक झाली आहेत. त्यातून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यात चांगलेच हातपाय पसरत असून आता औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल एका रात्रीत औरंगाबादमध्ये २४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तिथल्या एकूण रुग्णांची संख्या ६५१ झाली आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजेच गेल्या दीड महिन्यानंतर आज प्रवासी रेल्वे सुरू झाल्या आहेत. काल म्हणजेच ११ मेपासून रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं. अवघ्या तासाभरात तिकिट बुकिंग फुल्ल झालं. देशातल्या काही प्रमुख शहरांमधूनच या रेल्वे सध्या सुरू करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७० हजारांच्या वर गेला असून गेल्या २४ तासांत देशात ३६०४ रुग्णांची भर पडली आहे.
Spike of 3604 #COVID19 cases in the last 24 hours; total positive cases in the country is now at 70756, including 46008 active cases, 22454 cured/discharged/migrated cases and 2293 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/0xm42EjP6Z
— ANI (@ANI) May 12, 2020