आज कोरोनामुक्त गोव्यात रॅपिड पीसीआर टेस्ट दरम्यान सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्व सात जण मुंबईहून गोव्याला आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसंच त्याचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
Rapid PCR test of 7 persons has been found positive today. All 7 persons came to Goa from Mumbai, they all are asymptomatic. They have been put under quarantine. Their samples have been sent to Goa Medical College for confirmatory test: Goa CM Pramod Sawant pic.twitter.com/cZXH4FdsLy
— ANI (@ANI) May 13, 2020
मुंबईत बुधवारी ८०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५९६वर पोहचला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी लक्षणीय घट झाली असताना बुधवारी पुन्हा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबईतील बुधवारी ८०० कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. १० ते ११ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १९८ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५९६ वर पोहोचली आहे. मृत्यू झालेल्या ४० जणांमधील १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यान झाले आहेत. तसेच २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २४ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखालील, २० जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.
मुंबईत कोरोनाचे ५२८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ वर पोहचली आहे. तसेच ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३७९१ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत राज्यात २५ हजार ९२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसंच आतापर्यंत ५ हजार ५४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- नाशिकमधील २८ पोलिस हे कोरोनामुक्त झाले आहेत.
- राज्यात १ हजार २०० कंटेन्मेंट झोन आहेत.
- मालेगाव आणि औरंगाबादसाठी मायक्रो प्लॅन करण्यात आला आहे.
- मालेगावातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आहे.
- आतापर्यंत मालेगावातील २५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
इन्कम टॅक्स रिटर्न्समधून पेंडिंग रिफंड्स लवकरच दिले जातील. रिटर्न्स फाईल करण्याची मुदत ३१ जुलै २०२०पासून ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.
भारतातल्या सर्वात मोठ्या अशा १००० बेडच्या कोविड हॉस्पिटलची उभारणी बीकेसीमध्ये सुरू असून आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कामाची पाहणी केली.
राज्यात सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० तुकड्या तैनात करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे.
पीपीई किट, मास्क मिळेपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. ६०० ते ७०० कामगारांनी कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून सुरू केलं कामबंद आंदोलन!
मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये अजूनही ऑनलाई दारूविक्री सुरू नाहीच! जिल्हा प्रशासनाला अद्याप ऑनलाईन दारूविक्री सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे अजून काही दिवस वाट पाहावी लागणार.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची १ वाजताची नियोजित पत्रकार परिषद आता ४ वाजता होणार आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद झाल्यानंतर या घोषणा जाहीर झाल्यामुळे लगेच शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसू शकणार नाही.
Union Finance Minister Nirmala Sitharaman to address the media at 4 pm today. #EconomicPackage (file pic) pic.twitter.com/I1N5JjhkSe
— ANI (@ANI) May 13, 2020
मध्यप्रदेशमध्ये एका जैन मुनींच्या स्वागतासाठी सागर जिल्ह्यातल्या बांदा या ठिकाणी शेकडोंचा जमाव एकत्र आला होता. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Madhya Pradesh: A crowd gathered to welcome Jain monk Pramansagar in Banda, Sagar district yesterday. Praveen Bhuria, ASP Sagar says, "Directions given to investigate & take action against organizers if social distancing norms & section-144 were violated". pic.twitter.com/eWNgk4qf4o
— ANI (@ANI) May 13, 2020
देशात कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीवर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र, यामध्ये नक्की कोणत्या योजनांचा कोणत्या समाज घटकांसाठी कसा फायदा होईल, याची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची केलेली घोषणा शेअर बाजारासाठी उत्साह वाढवणारी ठरली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्सने तब्बल ११०० अंकांची उसळी घेतली आहे. निफ्टी देखील २८० अंकांनी वधारला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या शेअर बाजाराच्या पडझडीनंतरही ही सर्वाधिक उसळी आहे.
Sensex soars 935.42 points; currently at 32,306.54 pic.twitter.com/MzsxpYQeuY
— ANI (@ANI) May 13, 2020
गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ३ हजार ५२५ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले असून १२२ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ हजार २८१वर गेला आहे. यातल्या ४७ हजार ४८० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर २४ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा २४१५ झाला आहे.
Spike of 3525 #COVID19 cases and 122 deaths in the last 24 hours; total positive cases in the country is now at 74281, including 47480 active cases, 24386 cured/discharged/migrated cases and 2415 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/o6ylnSv1dk
— ANI (@ANI) May 13, 2020