पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधितांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा
रुग्णवाहिके अभावी पुण्यातील पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू
Corona : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण
कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना तो रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कोरोना लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. जे प्रयत्न सुरू आहेत त्यात सहभागी होणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. (सविस्तर वाचा)
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनानं खास पत्रक काढून ही माहिती दिली आहे. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन करत विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. (सविस्तर वाचा)
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ७८ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३७ लाखांवर गेली आहे. तर ६६ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.
Single-day spike of 78,357 new positive cases & 1045 deaths reported in India, in the last 24 hours.#COVID19 case tally in the country stands at 37,69,524 including 8,01,282 active cases, 29,019,09 cured/discharged/migrated & 66,333 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/MbdfCQtKbK
— ANI (@ANI) September 2, 2020
महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची तुलना जगभरातून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांशी केल्यास राज्य पाचव्या स्थानावर येत आहे. आज राज्यभरात १५ हजार ७६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागच्या २४ तासांत ३२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात १० हजार ९७८ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.