PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020
आपण लॉकडाऊनच्या निर्णयात तडजोड करू शकत नाही. लॉकडाऊनबाबत येत्या एक – दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे.
PM told us that we must not compromise on lockdown and we are receiving suggestions for extending it for next 15 days. PM said in next 1-2 days Govt of India will announce guidelines for next 15 days: Karnataka Chief Minister BS Yediyurappa on video conference of PM with CMs pic.twitter.com/tIrNqpN4p3
— ANI (@ANI) April 11, 2020
धारावीत कोरोनाचा चौथा बळी
धारावीतील एका ८० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असून ते अधिकारी किती जणांच्या संपर्कात आले आहेत. सध्या त्याचा शोध सुरू आहे.
२२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू
मालेगावात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी सकाळी मालेगावातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित तरुणीचा धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मालेगावातील दोन जणांचे मृत्यू झाले असून कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली आहे. (सविस्तर वाचा)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राज्यात वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले असून त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपास्थित आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढता दिसत आहे. राज्यात आज नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली आहे. (सविस्तर वाचा)
- मुंबई – ७२
- औरंगाबाद – २
- मालेगाव – ५
- पनवेल – २
- कल्याण – डोंबिवली – १
- ठाणे – ४
- पालघर – १
- नाशिक ग्रामीण – १
- नाशिक शहरी – १
- अहमदनगर – १
- पुणे – १
- वसई – विरार – १
एकूण – ९२
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे फैसला काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (सविस्तर वाचा)
‘लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील’, असे टेड्रोस एडहानोम याचे म्हणणे आहे. (सविस्तर वाचा)
औरंगाबाद शहरात पुन्हा दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
साताऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा २० वर
सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहोचला आहे.
कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता कोल्हापुरची संख्या ६ वर गेली आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेत उचत मधल्या कोरोनाग्रस्त तरुणाची ही नातेवाईक आहे.
राज्यात कोरोनाचा विळखा वाढला
राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात २१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार ५७४ झाली आहे. तर, १३ जणांचा बळी गेला आहे. तर आजपर्यंत १८८ लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे १००८ रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात २५४ रुग्णसंख्या आहे.