मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २१२० इतका वाढला आहे. याशिवाय २४ तासांत ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे एकूण ३७ रुग्ण २४ तासांत बरे होऊन घरी परतले आहेत.
देशभरात आत्तापर्यंत १३ हजार ३८७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात १००७ रुग्ण सापडले असून २३ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेमध्ये आज देशातील कोरोनाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
भिवंडीत कोरोनाचे आणखीन दोन रुग्ण सापडले ; रुग्णांची संख्या झाली चार
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या ३६ कार्यकर्त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे. याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.
Today my 36 workers tested corona negative who were actively involved with me in distribution net work
God is kind— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 17, 2020
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३,३८७ वर
मागच्या २४ तासात संपुर्ण देशात १००७ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १३,३८७ वर पोहोचला आहे. तर २४ तासा २३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
With 1,007 more cases, India's COVID-19 count reaches 13,387
Read @ANI story | https://t.co/XWcEApF093 pic.twitter.com/jwoh23fMPr
— ANI Digital (@ani_digital) April 17, 2020
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत्रकार परिषद सुरु आहे.
#WATCH Live from Mumbai – RBI Governor Shaktikanta Das addresses media. https://t.co/udYCSDJCwe
— ANI (@ANI) April 17, 2020
एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण बरे झाले
महाराष्ट्रात काल २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आता राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ३२०२ झाली आहे, तर यातील ३०० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण रुग्णांच्या संख्येपैकी १० टक्के रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेल्याचे कळते. निश्चितच पुढच्या काही काळात बरे होण्याचा आकडा वाढेल, अशी आशा करुयात.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणा-या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ञ डॉक्टरांचे विशेष दल ( टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.
या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.