घरठाणेठाण्यातील गॅरेजला भीषण आग; १५ दुचाकी जळून खाक

ठाण्यातील गॅरेजला भीषण आग; १५ दुचाकी जळून खाक

Subscribe

ठाणे येथील ऑटो गॅरेजला भीषण आग.

आगीचे सत्र सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या वडाळा ट्रक टर्मिनलच्या पार्किंमधील दोन बसला भीषण आग लागली. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. ठाणे येथील एका गॅरेजला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये तब्बल १५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश

ठाण्यामधील दाईघर परिसरातील पप्पू ऑटो गॅरेजला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीमध्ये १५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

वाळूज एमआयडीसीमध्ये आग

औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेले नाही. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


हेही वाचा – ठाणे परिवहन घोटाळा प्रकरणी ८ अधिकार्‍यांसह १० जणांवर गुन्हे


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -