एअर इंडिआ एक्सप्रेस विमान दुर्घटनेत जे प्रवाशी वाचले आहेत, त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी जाहीर केले.
नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
Kerala: Civil Aviation Minister, Hardeep Singh Puri visits Kozhikode Airport, where an #AirIndiaExpress flight crashlanded yesterday.
18 people, including two pilots, lost their lives in the incident. pic.twitter.com/RW2FQnAxNv
— ANI (@ANI) August 8, 2020
केरळ मधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झालेला आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी आज मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. जे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना २ लाख कर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.