घरताज्या घडामोडीगावा-पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची गळती कधी थांबणार?

गावा-पाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची गळती कधी थांबणार?

Subscribe

तालुक्यातील जवळपास ७० गावा-पाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन २० टँकरद्वारे या गाव पाड्याना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही दिवसागणिक नवीन गाव पाड्यांना टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रस्ताव येऊन पडत आहेत.

मोखाडा (ज्ञानेश्वर पालवे) : तालुक्यातील जवळपास ७० गावा-पाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन २० टँकरद्वारे या गाव पाड्याना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही दिवसागणिक नवीन गाव पाड्यांना टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रस्ताव येऊन पडत आहेत. मात्र ज्या गाव पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा बर्याचशा टँकरना गळती लागली असुन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. (Mokhada Palghar Village Water Issue Water Tank)

तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्ये पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पासुन २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असुन टंचाईग्रस्त गाव पाड्यातील विहिरीपर्यंत पाणीपुरवठा करतांना टँकर चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातही बरेचशा टँकर च्या टाक्या लोखंडी पत्र्याच्या असुन गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर टाकी गंजलेल्या ठिकाणी पाण्याला गळती सुरु होते. मुळात गाव पाड्यातील नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी पळसपाडा गावा जवळील धरणाच्या पायथ्याशी विहीर तयार करण्यात आली असून याच विहिरीतून हे पाणी तालुक्यातील अनेक टंचाईग्रस्त गाव पाड्यातील नागरिकांसाठी टँकरद्वारे पोहच केले जाते.

- Advertisement -

पाण्याचे टँकर भरण्याची विहीर ते गाव पाड्ये असे १५ ते २० किलोमीटरचे अंतर आहे, तर कुठे २० ते २५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे पाणी भरण्याची विहीर ते टंचाईग्रस्त गाव पाड्यातील विहीर हे अंतर जास्त असल्याने त्या गाव पाड्यातील विहिरी पर्यंत जाता जाता टँकरमधील हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे.

शासन वर्षाकाठी टंचाईग्रस्त गाव पाड्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर सारख्या वाहनांवर लाखो रुपयांचा खर्च करत असतात परंतु गाव पाड्यांना पाणीपुरवठा करणारे टँकर सुस्थितीत आहेत किंवा नाही याची खातरजमा का केली जात नाही? की केवळ टँकर लॉबीला पोसण्याचे काम तर पाणीपुरवठा विभाग करत नाहीना? असा प्रश्न यानिमित्ताने नक्की उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

कारण टँकरच्या लोखंडी टाक्या जर चांगल्या अवस्थेत असल्या तर टँकर मधील पाणी गळती रोखून टंचाईच्या भिषणतेत होरपळणाऱ्या गाव पाड्यांना अधिकचे पाणी मिळण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यांसह तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टँकरची लोखंडी टाकी व वाहन सुस्थितीत आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा – नवे शैक्षणिक धोरण : पुढच्या वर्षी 10वी-12वीच्या बोर्डाची परीक्षा होणार का? शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -