घरक्राइमसतत पैसे मागणाऱ्या मुलाची आईने केली हत्या; पिछा सोडवण्यासाठी पोलिसांसमोर आईचा बनाव

सतत पैसे मागणाऱ्या मुलाची आईने केली हत्या; पिछा सोडवण्यासाठी पोलिसांसमोर आईचा बनाव

Subscribe

मुलगा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास देत धमकावत असल्याने त्रासलेल्या जन्मदात्या आईने मोठया मुलाच्या व दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने आपल्या दोन नंबरच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणातील पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह कसारा घाटात टाकला. या हत्येचा उलगडा कसारा पोलिसांनी अवघ्या ४ तासात लावला. ठाणे येथील चिराग नगर येथे शिवाजी रामदास आगळे (वय २५), सतीश रामदास आगळे (वय २४) हे दोन भाऊ आपली आई मायाबाई रामदास आगळे हिच्यासोबत राहात होते. दोन भावा पैकी शिवाजी हा एका डेअरी मध्ये मजुरी काम करीत होता तर सतीश हा बेरोजगार होता तर आई घरकामगार होती.

नक्की काय घडले?

आरोपी आई ने दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगार असलेला सतीश हा घरात दररोज दारू पिऊन शिव्या देत पैशाची मागणी करीत होता. पैसे नाही दिले तर तुम्हाला मारून टाकीन अशी दम दाटी करायचा. असाच प्रकार त्याने ६ जानेवारी ला केला त्याच वेळी आई मायाबाई ने प्लॅन करीत आपल्या मोठया मुलाच्या आणि नात्याने भाचा असलेल्या अमृत जंगा बिरारे (वय २४) रा. नंदुरबार याच्या मदतीने ७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास सतिषची धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. त्याचे हात पाय बांधून त्याला दोन तीन प्लास्टिक पिशवीत गुंडाळून त्यानंतर त्यांचा मृतदेह एका गोणीत भरला. तो मृतदेह बोलेरो गाडी MH 39 J 1706 या गाडीत भरून सकाळी ६ च्या दरम्यान कसारा घाटातील दरीत टाकून दिला.

- Advertisement -

निर्दोष दाखवण्यासाठी आईने लढवली अशी शक्कल

दरम्यान दोन दिवसानंतर मयतची आई मायाबाई आणि शिवाजी आगळे यांनी एक बनाव रचला. ९ जानेवारी रोजी सकाळी मयत सतिषचे कपडे घेऊन पुन्हा कसारा घाटात आले तिथे टेहाळणी करून ते कपडे घाटातील (त्याच स्पॉट वरील) एका कठड्यावर ठेवले. तेथून काही अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीत गेले आणि तेथे कार्यरत असलेले महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांना भेटून मला फोन आलेला, आमच्या मुलाचा घातपात झालाय त्याचे कपडे घाटात आहेत, असे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कसारा पोलीस ठाण्यात कळवले. मग तपास सुरू झाला कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी.पी.भोये यांनी वरिष्ठांना माहिती देत पोलीस उपनिरीक्षक भोस आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घाटातील ठिकाणी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना घाटातील दरीत १५० फुटावर एक संशयस्पद पोते दिसले पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने दरीतील पोते वर काढले असता त्यात सतीश रामदास आगळे याचा मृतदेह आढळून आला. काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयतची आई मायाबाई आणि भाऊ शिवाजी यांना सोबत घेत त्यांना कसारा पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी कसारा पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मायाबाई आगळे आणि शिवाजी आगळे यांची स्वतंत्र उलट तपासणी केली असता अनेक सत्य समोर आले. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. हॉस्पिटलला रवाना केला.

४ तासात प्रकरण झाले उघड

या प्रकरणी कोकण परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश मनोरे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डि.पी.भोये, पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस,पोलीस उपनिरीक्षक धनवटे, अहिरराव, पोलीस कर्मचारी.बावधणे, बिन्नर, राठोड, चौधरी, गायकवाड, परदेशीं, हाबळे, सुनील जाधव, चाळके, परदेशीं, बोडखे, साहिल, कडव, राणे तसेच महिला पोलीस रुपाली पाटील, संजना पाटील, यांच्या पथकाने योग्य दिशेने तपास करीत अवघ्या ४ तासात खुनाचा गुन्हा उघड केला. फिर्यादी असलेल्या आई मायाबाई आणि भाऊ शिवाजीची चौकशी करून त्यांच्यासह त्यांचा नातेवाईक अमृत बिरारे यांना अटक केली. त्यांना शहापूर न्यायाल्याने १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोढडी सुनावली आहे. तपासकामात आरोपीच्या घरातून धारदार शस्त्र सह अन्य साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भोये करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -