घरताज्या घडामोडी२६/११ सारख्या मोठा हल्ल्याचा मनुसबा उधळला

२६/११ सारख्या मोठा हल्ल्याचा मनुसबा उधळला

Subscribe

जम्मू आणि काश्मीरमधील नगरोटा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. हे चार दहशतवादी २६/११ सारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांचा मनसुबा उधळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात थेट पाकिस्तानचे नाव घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही ट्विट केली आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ज्या इराद्याने भारतात आले होते, ते पाहता आमच्या सतर्क सुरक्षा दलांनी त्यांच्या इराद्यावर पाणी फेरले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि त्यांच्या सतर्कतेमुळे दहशवाद्यांचा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकशाही प्रणालीला लक्ष्य करणारा एक अपवित्र कटाचा पराभव केला आहे.

- Advertisement -

या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ४ दहशतवादी २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी २६ नोव्हेंबरलाच पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना गुरुवारी पहाटे ४ वाजता चकमकीत ठार करत त्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्र सचिव, आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुख अधिकारी यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतली. हे दहशतवादी २६/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -