महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) ची तयारी करणाऱ्या किनगाव अहमपूरच्या तरूणीवर ओढावलेल्या अतिप्रसंगावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून त्या मुलीने विचारलं म्हणून तिला घरात घूसून २तास या लांडग्यांनी मारहाण केली तिच्या सर्वांगावर चावे घेतले गेले. तसेच तिच्या गुप्तांगात दगड टाकले. गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला. राज्यात झुंडशाही सुरू आहे का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
#mpsc ची तयारी करणारी किनगाव अहमदपूरची तरूणी
गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारलं
तर
तिला घरात घूसून २तास या लांडग्यांनी मारहाण केली तिच्या सर्वांगावर चावे घेतले तिच्या गुप्तांगात दगड टाकले
गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला..१ pic.twitter.com/fGGLOIOrBu— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2021
राज्यात झुंडशाही सुरू आहे का
घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी ??
अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून ४ च दिवस उलटले
बलात्कार्यांना अभय देण्याच्या सरकारच्या भुमिकेमुळेच हे हरामखोर माजलेत ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते
कुछ तो शर्म करो..२
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2021
अहमदपूर ची पिडीतेला पोलिसांनी अंबेजोगाईच्या स्वामी रामानंदतिर्थ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जा म्हणून सांगितलं पण @LaturPolice नी याबाबत रूग्णालय प्रशासनाला माहिती न दिल्याने उपचार अजुनही सुरू नाहीत
पिडीतेचा भाऊ जो आताही तिच्या सोबत आहे त्याचं हे म्हणणं आहे
मदत करा @MahaPolice— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 14, 2021
घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी ?अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून ४ च दिवस उलटले. बलात्कार्यांना अभय देण्याच्या सरकारच्या भुमिकेमुळेच हे हरामखोर माजलेत ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते. कुछ तो शर्म करो अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मुलीवर ओढावलेल्या प्रसंगावर राज्यकर्त्यांना जाब विचारला आहे. तसेच अहमदपूर ची पिडीतेला पोलिसांनी अंबेजोगाईच्या स्वामी रामानंदतिर्थ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जा म्हणून सांगितले. पण लातुर पोलिसांनी याबाबत प्रशासनाला माहिती न दिल्याने उपचार अजुनही सुरू नाहीत असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले. पिडीतेचा भाऊ जो आताही तिच्या सोबत आहे. या संपुर्ण प्रकरणात त्या मुलीचा भावाने हे सगळ प्रकरण चित्रा वाघ यांच्याकडे मांडले. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.