घरताज्या घडामोडीलॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नाही

लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नाही

Subscribe

देशभरात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जनता चांगलीच भयभीत झाली आहे. त्यात महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे. लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तो निर्णय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयही घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाबाबत आढावा घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले, सध्या आपण सेफ झोनमध्ये आहोत. महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती आहे. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगलीच आहे. तरी देखील लोकांमध्ये पुन्हा जनजागृतीची गरज असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत आजची कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती उत्तम आहे. जिल्हाधिकार्‍यांना आता टार्गेट देण्यात येत आहे. मिलियन टेस्ट वाढवल्या पाहिजेत. या संदर्भात अधिसूचना देखील आजच काढण्यात येणार आहे. राज्यात टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लसीकरण संदर्भात सखोल चर्चा झाली. देशात 5 व्हॅक्सिन तयार होत आहेत. देशात 30 कोटी लोकांना प्राधान्याने लस द्यायची आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

काही व्हॅक्सिनचे 2 डोस तर काहींचे 3 डोस द्यावे लागणार आहे. परिणाम आणि कालावधी हा महत्त्वाचा भाग असणार आहे, असंही ते म्हणाले. काही व्हॅक्सिन उणे 20 डिग्रीमध्ये ठेवाव्या लागणार आहेत. लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे केंद्र सरकार राबवणार आहे.

- Advertisement -

एका साथीच्या रोगाच्या (महामारी) 3 लाट असतात. पण दुसरी आणि तिसरी लाट जेव्हा येते तेव्हा रुग्णांची संख्या शून्य (0) होते. पण देशात सध्या कुठेच कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आलेली नाही. जनतेला आवाहन आहे की, SOP काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आणि आता त्या बंद कराव्या लागल्या. त्यामुळे तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये, यासाठी काही सुरक्षा निर्बंध घातले जाऊ शकतात. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स बनवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -